श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर येथील प्रचार सभा
महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी सभेमध्ये भाषणादरम्यान मोदी आणि फडणवीस सरकारच्या लोकांना सुखी, आनंदी आणि सुरक्षित करण्याच्या करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला. कोल्हापूर जिल्हा हे महसूल आणि कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी नेहमीच घरचे मैदान राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी नेहमीच सतर्क असतात. आत्ताच त्यांनी जयसिंगपूर, कोल्हापूर जिल्हा येथे एका सभेला उपस्थिती लावली. या सभेदरम्यान त्यांनी मतदान, लोकशाहीचे महत्त्व आणि बीजेपी सरकारच्या विविध कार्य पूर्ततेचा आढावा घेतला. कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी मजबूत यंत्रणा देशाला प्रदान करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी पुढे असेही सांगितले की भारतातील प्रत्येक नागरिक त्याच्या एका मताने सरकार नियुक्तीच्या यंत्रणेमध्ये सहभागी आहे. या लोकशाही पद्धतीमध्ये सर्व आर्थिक गटातील लोक एकाच पारड्यात समाविष्ट आ...